नमस्कार मित्रहो,
आज भारताच्या कानाकोप-यातून चळवळीचे वारे घोंगावताना दिसत आहेत. या सर्वानी वेगवेगळ्य़ा मुद्यांवर आपला लढा उभारला आहे. पण या देशाला सांस्कृतीक चेहरा देणार निर्माण कर्तावर्ग, ईथली संपत्ती (रिअल अस्सेट) तयार करणारा कष्टकरी वर्ग व बुद्दीमत्तेची जोड देऊन या देशाला वैभवाच्या वेगवेगळ्या पातळ्या गाठून देणारा ईथला निर्माणकर्ता वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहीला. आज राजे महाराजे यानी जे काही भव्य दिव्य वास्तू उभारल्या त्यांच्या मागे पैसा हा राजाचा होता पण बुद्धी, कष्ट व अनूभव आपल्या लोकांचा होता. या देशातील सत्ता, संपत्ती व संस्कृतीचे खरे निर्माते आपण आहोत. तर आता आपण एकत्र येऊन आपल्या वैभवशाली इतिहासाची पुनरावृत्ती करु या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा