बुधवार, २९ जून, २०११

भविष्य या देशाचे पुन्हा हेच घडवणार आहेत....!

धर्मशास्त्रे जो समाजेतिहास सांगतात तो प्रत्यक्ष मानवी समाजाच्या इतिहासाशी जुळत नाही, म्हणुन त्याला महत्व देण्याची मुळात गरज नाही वा त्यावरुन भांडण्यातही काही अर्थ नाही. आवश्यकता आहे ती कालसुसंगत नवनिर्मितीची आणि या सर्व निर्मानकर्त्या समाजघटकांमद्धे नवे आत्मभान आणुन नवा इतिहास घडवायची!

आपल्याला धर्मशास्त्रे सांगतात कि आधी ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि शेवटी पायापासुन शुद्र जन्माला आले. ही एक धार्मिक भाकडकथा आहे हे उघड आहे. वास्तवात मनुष्य आधी अन्नसंकलक होता...मग तो शिकारी बनला. शिकारीसाठी लागणारी हत्यारे त्यानेच शोधली. त्याचे हजारो पुरावे आज भारतात मिळतात. नंतर पशुपालक समाज आणि मग क्रुषिवल समाज आस्तित्त्वात आला.

धर्माची निर्मिती ही एका विशिष्ट समाजघटकाने केलेली नाही. धर्म ही तत्कालीन मानवी समुहांची श्रद्धामय अभिव्यक्ती होती व त्यासाठीची प्रतिके त्यांनी निसर्गातुनच शोधली. प्रतिकसाम्यांतुन तत्कालीन प्रतिमा-पुजक लोक आस्तित्वात आले. त्यामुळे आद्य धर्माची निर्मिती ही सामुदायिक होती असेच म्हणावे लागते. त्यानंतर व्यक्तिपरणीत धर्म आस्तित्वात आले ते परंपरागत धर्मातील त्रुटी दुर करण्यासाठी. हे धम्म-प्रवर्तक ब्राह्मण नव्हते हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर हिंदू धर्मातील एकही अवतार (वामन अवतार वगळता कोणीही ब्राह्मण नाही...पण या अवताराबद्दल नंतर लिहितो.) त्यामुळे धर्मशास्त्रांतील समाजनिर्मितीचे सिद्धांत पुरेपूर गैरलागु ठरतात...खोटे सिद्ध होतात. त्या सिद्धांतांची निर्मिती प्रतिकात्मक म्हणुन पाहु शकतो वा धर्ममहत्ता ठसवण्यासाठी केली गेली असेही म्हणु शकतो. पण त्याबद्दलचा वाद हा गैरलागू आहे. आपला वेळ आणि प्रतिभा त्यासाठी किती वाया घालवायची हे आपल्यालाच ठरवावे लागणार आहे.

समाजेतिहास असे सांगतो कि राजसत्ता आणि धर्मसत्ता या आधी टोळीप्रमुखाच्या/ग्रामप्रमुखाच्या हाती असे. लढण्यायोग्य होते ते सारेच युद्धांत वा रक्षणात भाग घेत. तेच जीवनोपयोगी संसाधनांच्या शोधात असत व निर्मिती करत असत. पशुपालक माणसाच्या सोबत क्रुषीमानवही आला तो याच विराट समाजातुन. याच समुदायातुन आद्य धातुकर्मी...लोहार आले आणि काष्ठकर्मी सुतारही. कारण तत्कालीन गरजा...मग त्या शस्त्रांच्या असोत कि निवासाच्या...हेच घटक सांभालत होते. त्यासाठी त्यांना केवढी प्रतिभा पणाला लावावी लागली असेल याबद्दल मी नंतर लिहिणारच आहे...पण गरज जशी निर्माण होत गेली तसतसे एकेक तंत्रद्न्यान निर्माण होत गेले...त्यातील कुशल प्रतिभावंत मानवी समाजाला पुढे नेण्यात अग्रसर होत गेले.

स्त्रीया यात मागे नव्हत्या. जिला हा धर्म सरसकट शुद्राचा दर्जा देतो तो इतिहास पाहता निव्वळ अधमपणाच आहे. आध्य शेतीची जनक आहे ती स्त्री. कोणत्या वनस्पती खाद्य...कोनत्या अखाद्य आणि त्या खाद्य असल्या तरी कोणत्या पद्धतीने कराव्यात याचे शास्त्र स्त्रीया विकसीत करत गेल्या. त्यांची विद्न्यान/प्रयोगशीलतेचे आज सारी मानवजात फायदे घेत आहे हे विसरता येत नाही. आद्य मानवाने स्त्रीला आदिशक्तीच्या रुपात का पाहिले हे यावरुन लक्षात यावे...पण आज आपण क्रुतघ्न आहोत आणि याची शरम क्वचितच दिसते.

येथे एवढेच स्पष्ट करायचे होते कि धर्म जो मानवेतिहास सांगतात तो खरा नाही. तसे पुरावेही नाहीत. पण त्याचा गेली काही हजार वर्षे सावकाश पगडा बसत गेल्यामुळे जे आद्य होते ते शेवटचे आहेत आणि जे सर्वात शेवटी त्याच समाजातुन धार्मिक गरजांसाठी निवडले गेले म्हणुन आले ते मात्र आद्य असा भ्रम निर्माण होत गेला. ज्यांनी त्यांना धर्मकार्यासाठी म्हणुन आपल्यातुनच निवडले होते ते कालौघात समाजाशी उपक्रुत भावना न ठेवता स्वयंघोषित श्रेष्ठत्व मिरवु लागले. पण असे घडायला असंख्य कारणेही आपल्याच समाजेतिहासात/आर्थिक इतिहासात दडलेली आहेत. त्यावरही आपल्याला निरपेक्ष चर्चा करायची आहे.

मानवेतिहासात प्राचीन काळी सुरक्षा, विकास, प्रयोग...संशोधन आणि त्यांचा विकासासाठी उपयोग करुन घेत मानवी जीवन सुसह्य बनवणे असाच होता. धर्म ही प्रत्यक्ष जीवनातील एक मानसीक गरज होती, तिला तसे ऐहिक मुल्यच नव्हते. आजही या मुलभुत तत्वद्न्यानात बदल झालेला नाही...पण या देशातील मुळ निर्मानकर्ते मात्र संशोधन-विकासापासुन मागे हतत गेले हेही एक वास्तव आहे. नवे जग घडवण्याची, तेवढ्याच तोडीची अत्याधुनिक जीवनसाधने शोधण्याची त्यांच्यात क्षमता होती...पण ती मध्ययुगापासुन कोंडीत पकडली गेली. आकांक्षांनी फुलून जाण्याऐवजी ते क्रमशा: हतबल होत गेले...

आजच्या जगात या निर्मानकर्त्यांची ससेहोलपट होते आहे. जे लोक प्रसंगी राजांना कर्ज देत ते आज जगण्याच्या वाटा शोधण्याच्या प्रयत्नांत हताश होत आहेत.

मनावर एक राख जमा झालीय...हवीय एक जोरदार वावटळ....भविष्य या देशाचे पुन्हा हेच घडवणार आहेत....!


BY: SANJAY SONAWANI

सोमवार, २७ जून, २०११

धनगरांचा गौरवशाली इतिहास

धनगरांचा गौरवशाली इतिहास

निर्मिती ही बहुपेडी असते. संपत्ती, सत्ता, संस्क्रुती, कला, वास्तु अणि साहित्यातुन ती परिस्फुट होत असते. महाराष्ट्रातील आद्य वसाहतकार हे पशुपालक होते हे मे आधीच्या लेखांत स्पष्ट केले आहे. सावळदा संस्क्रुतीचे सर्वात पुरातन अवशेष आता तापी नदीच्या खो-यात सापडले आहेत आणि त्यांचा काळ हा इसपु ३००० इतका मागे जातो. या प्रदेशात सापडलेल्या अवशेशांवरुन या संस्क्रुतीचे निर्माते अहिर पशुपालक होते असे स्पष्ट होते. या प्रदेशातील भाषेला अहिराणी म्हणतात यावरुन यांची प्राचीनता लक्षात यावी. पशुपालन, मासेमारी, व काही प्रमानात शेती हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय होता हे आता स्पष्ट झाले आहे.

थोडक्यात हे लोक आजच्या धनगर समाजाचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही. यामागोमाग पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)

सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.

सादवाहन (सातवाहन) हे मुळचे औंड्र वंशीय अहिरांपैकीच आहेत हे आता नवीन संशोधनानुसार स्पश्ट झाले आहे. सातपुडा पर्वताच्या परिसरात त्यांचा उगम झाला हे त्यांच्या मुलनामावरुन सिद्ध होते. उदा. प्राक्रुतात सातपुडा हा छात-छवत या नावाने ओळखला जात होता. सातवाहनांची मुल प्राक्रुत नावे छातवाहन...छातकरनी अशी आहेत. आद्य सम्राट सिमुखाचे खरे प्राक्रुत नाव छिमुक असे आहे. प्राक्रुत शब्दांचे संस्क्रुतीकरण करण्याच्या नादात मुळ अर्थ हरवण्याचा प्रकार घडला आहे. (पहा: महाराष्ट्र ग्याझेटीयर...प्राचीन काळ-१) थोदक्यात आजच्या सातपुड्याच्या, म्हणजेच खानदेशच्या भुमीतुन हा राजवंश पुढे आला. सातपुडा परिसरातुन आले म्हणुन सातवाहन...याचा संस्क्रुत अर्थ नाही कारण तो प्राक्रुत भाशेतील आहे, पण अनेक विद्वान हा शब्द संस्क्रुतातुन आला असावा असे समजुन अर्थ काढत बसले म्हणुन मोठी फसगत झाली आहे. सादवाहन हे नेहमीच महाराष्ट्री प्राक्रुताचे समर्थक होते...इतके कि त्यांच्या जवळपास ४५० वर्षांच्या कारकिर्दीतील एकही लेख संस्क्रुतात नाही. स्वतंत्र राज्यस्थापनेपुर्वी हे चंद्रगुप्त मौर्याचे सामंत होते. चंद्रगुप्त मौर्य हा मोरीय या पशुपालक समाजातुनच पुढे येत सम्राट बनला होता हा इतिहास आता स्पष्ट झाला आहे. यावरुन दोन्ही समाजांचे पुरातन नाते स्पष्ट होते.
एवढेच नव्हे तर हाल सादवाहनाने गाथा सप्तसही च्या रुपात एक अलौकिक वाड्मयीन ठेवा आपल्यासाठी निर्माण केला होता हे कसे विसरता येईल? सादवाहनांनी विदेशी व्यापार वाढवला होता. त्यांचे नौकाशास्त्र एवढे प्रगत होते कि मेगास्थानिसनेही त्याचा आदरपुर्वक उल्लेख केला आहे.

पुढे वाकाटक, कदंब, यादव, भोज हे महाराष्ट्रातील राज्यकर्तेही याच विस्त्रुत समाजातुन उदयाला आले. याचे कारण म्हणजे, हा पशुपालक समाज तत्कालीन अर्थव्यवस्थेत सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक होता. हा समाज पराक्रमी तर होताच पण निर्मितीक्षमही होता. महाराष्ट्रातील आद्य संस्क्रुतीची पाळेमुळे रोवुन हा समाज थांबला नाही तर त्यात तो व्रुद्धी करत राहीला. सादवाहनकालीन लेणी आजही त्या निर्मितीक्षमतेची उदाहरने आहेत...जी धनगर समाजाला आजही आपल्या पुर्वजांबद्दल अभिमान देत राहतील. याच समाजातुन व्यवसायाधिष्ठीत कौशल्य असनारे घटक विकसीत झाले. त्याबद्दल पुढे लिहिणारच असल्याने येथे फक्त पुरातन व्यवसायाशी नाळ जुळवुन आजही राहिले त्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचे आहे.

सादवाहनांचे सांगत असतांना जेजुरीच्या खंडेरायाबद्दल लिहिणे अत्त्यवश्यक आहे. खंडोबा हे लोकदैवत असुन नंतर त्याचे मर्तंड-भैरव वा शिवाशी नाते जुळवले गेले असे सोंथायमर ते डा. रा, चिं. ढेरे सांगतात. पण हे वास्तव नाही. धनगर (औंड्र/पुंड्र/अहिर इ.) हे सारेच मुलचे शिवपुजक आहेत. सादवाहन घराण्यात स्कंद (हे संस्क्रुतीकरण आहे...मुळ नाव खंड...त्याच्या काही नाण्यांवर फक्त खद असेही लिहिलेले आहे...कदाचित अनुस्वार कालौघात अस्पष्ट झाला असेल.) हा सम्राट इ.स. १५६ मद्धे होवुन गेला. त्याच्या अलौकिक पराक्रमामुळे हाच राजा जेजुरीचा खंडेराय म्हणुन पुज्य बनला असावा एवढे पुरावे आता समोर येत आहेत. आजही धनगरांना खंडेराय हा किती पुज्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. खरे तर ते त्याच्या रुपात आपल्या अलौकिक सामर्थ्याच्या पुर्वजाचीच पुजा करत आहेत. म्हणजेच श्री विट्ठल आणि खंडेराय, जी आजच्याही महाराष्ट्राची आराध्ये आहेत ती मुळच्या धनगर समाजातील महापुरुषांची दैवतीकरणे आहेत हे उघड आहे.

याबद्दल विस्ताराने एक ग्रंथच लिहावा लागेल. येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे आज सामाजिक द्रुष्ट्या अवनतीला पोहोचलेला, नव्या युगात जीवनसंघर्षात व्यस्त झालेल्या या समाजाला आपले मुळ स्वरुप कळायला हवे यासाठी हा प्रपंच. जवळपास ८व्या शतकापर्यंत या समाजाने राजकीय व आर्थिक द्रुष्ट्या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करुन दिले. महाराष्ट्रातील लोककला/नाट्य/संगीताचे मुळ जनक हेच. यांचे मौखिक साहित्य/दंतकथा आजही अंधारात आहेत. आपले पुर्ववैभव आणि निर्मितीची क्षमता विसरत गेली आहे कि काय?

प्रत्येक समाजाला उन्नती आणि अवनतीचे चक्र उपभोगावे लागते हे खरेच आहे. एक झापड येते आणि नाविण्याची हौस संपते. आहे तेच कसे सांभाळायचे, बदलांशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रश्नचिन्ह उभे रहाते. एखादे मल्हारराव, यशवंतराव वा साध्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई येतात...निर्मितीला चालना देतात...पण त्यातुन बोध मिळतोच असे होत नाही. काही लोक शिवरायांपारही काही इतिहास होता याकडे का वळत नाहीत याचे उत्तर खुप साधे आहे कारण त्यापलीकडे त्या समाजघटकाचा विशेष असा मुळात इतिहासच नाही. ते धनगरी सत्तांचे सरंजामदारीपद उपभोगत गेले आणि नंतर मुस्लिमांचे सरदार बनले हे एक वास्तव आहे. आणि ज्यांचा इतिहास आहे ते मात्र आजच्या सत्तेच्या राजकारणात प्यादे बनवले जात आहेत. जीवनाच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष त्यांना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आपल्याच उप-घटकांत...मग ते अहिर असोत कि अन्य कोणी...ऐक्य साधले जात नाहीय.

मला एकच सांगायचे आहे...बाबांनो तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली. त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही. त्याची पुनराव्रुत्ती वेगवेगळ्या अंगाने करायची असते याची जाण विसरलात...

आता तरी जागे व्हाल?

-BY: SANJAY SONAWANI

विभक्तीकरणातले एकाकारत्व

सर्वच समाजघटक एकाच वेळीस निर्माण झालेले नाहीत. जसजसा मानवी समाज वाढत गेला तसतशा समाजाच्या गरजा वाढत गेल्या. रक्षनासाठी जशी उच्च प्रतीची हत्त्यारे आवश्यक बनुन गेली तसेच उदरभरणासाठी शेती ते पशुपालन व्रुद्धी करनेही आवश्यक बनुन गेले. निवासांची गरज वाढली तसेच वस्तीरक्षणासाठी काही बहाद्दर लोकांची गरज भासु लागली. दळनवळणासाठी/वाहतुकीसाठी गाड्यांची गरज वाढली तसेच युद्धांसाठी रथादि वेगवान साधनांचीही गरज वाढली. मत्स्योद्योगांसाठी/व्यापारासाठी जशा उत्तम नौकांचा शोध लावत बांधणी करावी लागली तसेच शेतीसाठी नांगर ते अन्य उपकरणे शोधावी लागली...बनवावी लागली. त्याचवेळीस धार्मिक कार्यासाठी आवश्यक मंदिरे, कलात्मक शिल्पे याचीही गरज वाढत गेली तसतशे वास्तुरचनाकार आणि शिल्पकार निर्माण झाले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
मनुष्याची प्रगती ही अन्न-संकलक मानव, शिकारी मानव, पशुपालक मानव आणि क्रुषि मानव अशी झाली आहे. महारष्ट्रातील पाषणयुग, ताम्रयुग ते महापाषाण्युगातील अनेक वसतीस्थाने सापडली आहेत. शिकारी मानव ते पशुपालक मानव या प्रगतीचा आलेख स्पष्टपणे पहायला मिळतो. हा काल सनपुर्व २००० पासुन सुरु होतो. गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांचे मोठे कळप पाळले जात होते याचे पुरावे सापडतात. त्या कालातील मानव हा स्थिर नसुन चरावु कुरणांच्या शोधत भटकत असे. तो शेती शिकला असला तरी ती बव्हंशी फिरत्या स्वरुपाची होती. अद्यपहि पशुपालन हाच महत्वाचा व्यवसाय होता. हळुहळु शेती विकसीत झाली, अगदी नद्यांवर बांध घालुन शेतीला पाणी पुरवण्यासाठी कालवे काढण्यात आले. या काळात धर्मश्रद्धा विकसीत झाल्या असल्या तरी पुरोहित जातीचा उदय झाल्याचे दिसत नाही. टोळीप्रमुख पुरुष वा स्त्री यांच्याच हातात तत्कालीन धर्म होता. या समाजाचा म्रुत्योत्तर जीवनावर विश्वास होता. त्या काळातील अनेक दफने सापडली आहेत. म्रुतासोबत जीवनोपयोगी वस्तु, अलंकार व अश्वही पुरले गेल्याचे दिसते. मात्रुपुजा ही प्रधान होती. त्यामुळे हा समाज मात्रुसत्ताक पद्धती पाळणारा असु शकेल. जीवन सुखकर, रक्षित आणि आपत्तीहीन असावे यासाठी भौतिक साधनांचा शोध निरंतर सुरु होता. याच वेळीस जीवनातील, निसर्गातील गुढे सोडवण्याचा अविरत प्रयत्नही सुरु होता. त्यातुनच प्रथम शामान (पुरोहित) घटक उदयाला आला आणि जसा समाज अधिकाधिक स्थीर होवू लागला तशी त्यातुनच ब्राह्मण या घटकाचा उदय झाला. पण राज्यकर्ते, लोहार, सुवर्णकार (अलंकार निर्माते), सुतार, वीणकर, गवंडी (वास्तुकार) हे आद्य पशुपालक समाजातलेच व्यवसायनिष्ठ घटक निर्माण झाले होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. पुराकथा वा धार्मिक वाद्मय जरी ब्राह्मण हा प्रथम आणि अन्य समाजघटक नंतर अशी मांडणी करत असले तरी ते समाजेतिहासाचे वास्तव नाही हे कोणीही पुरातन समाजशास्त्राचा अभ्यास केला तर लक्षात येइल.
धर्म ही समाजाची निकड असते आणि समाजच धर्म निर्माण करत असतो. (येथे धर्म हा शब्द religion या अर्थाने घ्यायचा नाही.) धर्मकार्यासाठी तशी आवड व विशिष्ट मनोरचना असनारे निवडले जात होते...कारण जन्माधारीत जातीव्यवस्था अद्याप निर्माण झालेली नव्हती. म्हणजेच वंशपरंपरागत व्यवसाय यापेक्षा ज्याचे कौशल्य ज्यात आहे तो व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळेच आहे त्याच समाजात जसजसे जीवनावश्यक शोध गरजेपोटी लागत गेले तसतसे नव-नवे व्यवसायाधिष्ठीत कुशल लोकांचे गट निर्माण झाले. उदाहरणार्थ शिंपी हा घटक इस. पहिल्या शतकाच्या आसपास निर्माण झाला. तत्पुर्वी अधोवस्त्र आणि उरोवस्त्र अशीच वेशभुशा असे...शिवलेली वस्त्रे वापरण्याची पद्धत नव्हती.
यातील एकही गट अवकाशातुन पडलेला नव्हता हे येथे लक्षात घ्यायला हवे. आहे त्याच समाजातील कुशल/नवनिर्माते लोकांनी समाजोपयोगी संसाधने निर्माण केली आणि समाजाची एकुणातील प्रगती साधली असेच येथे म्हणावे लागते.
राजाचे कार्य त्या काळात सिमित होते. आहे त्या प्रजेचे रक्षण करणे, सोयी पुरवने, विस्तार करणे व त्या बदल्यात अल्प कर घेणे एवढेच त्याचे कार्य असे. आपण पशुपालक समुदायातील सातवाहन (औन्ड्र) या राजांची ३५० वर्षांची कारकिर्द बघीतली तर एक महत्वाची बाब लक्षात येते ती ही कि त्या काळातील कररचना अत्यंत सौम्य होती. त्यांनी स्वत:साठी कसलेही भव्य प्रासाद बांधलेले नाहीत. ते अत्यंत साधे जीवन जगत. पण त्यांनी महाराष्ट्रातील पहिले गिरी-किल्ले बांधले, नगरे उभारली आणि व्यापार सुकर केला.
सातवाहन कालात सर्वच निर्मानकर्त्यांच्या शहरो-शहरी श्रेण्या असत. त्या आजच्या पेढ्यांप्रमाणे कार्य करत. वस्त्रोत्पादक ते लोहारांचा कुशल माल नुसता स्थानिक बाजारपेठेपुरता नव्हता तर सुदुर प्रदेशात जावुन त्यांचा व्यापार/विनिमय होत असे. त्यासाठी रस्ते, विश्रामग्रुहे/धर्मशाला/पानपोया यांची व्यवस्था राज्यकर्ते करत त्याचवेळीस सर्व-धर्म-समभाव पाळत सर्व धर्मियांसाठीच्या धर्मस्थानांच्या निर्मितीतही सक्रीय सहभाग देत. सातवाहन काळात, सातवाहन बौद्ध नसले तरी ३५० च्या आसपास लेणी निर्माण केली गेली.
यासाठी अर्थपुरवठा राजांनी व समाजाने केला असला तरी त्यामागील संकल्पना, अमुकच ठिकाणी लेणीसमुह होवु शकतो अशा डोंगररांगांचा पुर्वाभ्यास-सर्वेक्षण करुन मग त्याचे वैद्न्यानिक अभिरेखन आणि अंमलबजावणी करुन हे कलात्मक वास्तु-चमत्कार घडवणारे कोण होते? ( आजचे साधे हाय-वे वरील बोगदे बनवण्याआधी आजचे तंत्रद्न्य एवढा आटापिटा करतात...आणि ते किती वेळा बंद होतात याचा विचार करा...तुलना करा...) आज इतिहासाला त्यांची नावे माहित नाहीत. खडक आत किती एकसंघ आहे याचे द्न्यान नसता लेणी खोदली जावू शकत नाहीत. आत नेमके काय आणि कसे खोदायचे आहे...कोठे काय आणि कसे कोरायचे आहे त्याचा पुर्व आराखडा असल्याखेरीज मुळात काम सुरु होवू शकत नाही. ही प्रतिभा व द्न्यान असनारे लोक कोण होते? ते याच मानवी समुदायातील वास्तुकार, पाथरवट, शिल्पकार आदि खरे निर्माणकर्ते समाजघटक होते यात शंका नाही. आजही आधुनिक विद्न्यान पणाला लावले तरी अशी लेणी पुन्हा उभारता येणार नाहीत. हीच बाब किल्ल्यांबाबत म्हणता येते. असे अभेद्य किल्ले (मग ते गडमाथ्यांवरील असोत कि सागरी...कि भुईकोट) कोणाच्या कल्पनाशक्ती/वास्तव द्न्यान/आणि निर्मितीच्या भावनेतुन झाले? याच किल्ल्यांमुळे काही शतके महाराष्ट्र सुरक्षित राहिला हे येथे विसरता येत नाही.
जेंव्हा किल्ल्यांचे निर्माण थांबले...जेंव्हा लेण्यांचे निर्माण थांबले...नवीन नगरे वसवण्याचे थांबले...तेंव्हा या कलेतील द्न्यानवंतांचे काय झाले बरे? हा प्रश्न आपला इतिहास कधीच विचारत नाही. औद्योगिक क्रांतीनंतर स्थानिक पारंपारीक काही व्यवसायांची जी ससेहोलपट झाली तशीच त्यांची झाली असनार व दुय्यम व्यवसाय पोटापाण्यासाठी स्वीकारावे लागले असणार...नाही का?
पण हा झाला नंतरचा काळ. आपण अशा कालाबद्दल चर्चा करत होतो जेंव्हा नवनिर्माण ही सर्वच समाजाची गरज होती आणि त्यासाठी आहे त्याच जनसमुदायातील काही लोक आपापल्या कल्पना व निर्मानक्षमता घेवुन त्या गरजा पुर्ण करायला पुढे येत होते. विदेशांशी व्यापार सुरु होता. त्यासाठी अवाढव्य नौका बांधणारेही याच लोकांतुन पुढे आलेले होतेच. एक-शीडाच्या नावेपासुन १५०-२०० शिडांची जहाजे बनवायला हेच लोक शिकले.
हे सर्वच पशुपालक (धनगर/गवळी), शेतकरी (आजचे कुणबी), माळी, कोष्टी, सुवर्णकार, वीणकर, सुतार, लोहार, चांभार, मातंग, महार, बुरुड, पाथरवट, गवंडी अशा असंख्य समाजघटकांनी ख-या अर्थाने नवनिर्मिती केली. राजे आले राजे गेले...जे याच समुदायातुन आले होते...कधी येथील आपली सत्ता तर कधी परकियांची....यातील जीवनसंघर्ष भोगत त्यांनी आपापल्या कुवतीनुसार निर्मिती केली. आज जगातील आस्चर्ये आहेत त्यामागे यांची प्रतिभा होती...त्यांचे विद्न्यान होते. त्यामुळेच समाज जगला. संस्क्रुती निर्माण करु शकला. पोट भरु शकला. तो वाकवला गेला पण तोडता आला नाही. धार्मिक स्म्रुत्या आल्या नि गेल्या, पण त्यांची पत्रास किमान मध्ययुगापर्यंत कोणत्याही समाजघटकाने ठेवलेली दिसत नाही. ब्राह्मणांचे नियत कार्य म्हणजे फक्त धर्मकार्य...पण तेही शेतीत पडले...तेही तलवार हाती घेते झाले. तेही व्यापारत पदले...सातवाहन काळातच...
धर्म समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी असतो...विभक्तिकरणासाठी नाही. पण हे तत्व मध्ययुगात कसे विसरले गेले हा एक चर्चेचा विषय आहेच. नेमकी मध्ययुगातच नवनिर्मिती जवळपास कशी थांबत गेली यावरही चिंतन आवश्यक आहेच. त्याला जबाबदार राज्यकर्ते होते, अस्थिर स्थिती होती, पारतंत्र्य होते कि धर्मानेच या नव-निर्मितीला चुड लावली यावर आपण पुढील लेखात चर्चा करुयात.
पण जी काही येथील संस्क्रुती आहे...भले ती आज अवनतीला का पोहोचली असेना....तिचे निर्माते आणि तिला आजही अल्परुपात का होइना पोसनारे कोण होते एवढे लक्षात आले तरी सध्या पुरेसे आहे. एकाच मानवी समुदायातुन व्यवसायाधिष्ठीत वेगळे झालेले हे समाजघटक आहेत...मग धर्मशास्त्रे कितीही खोटे का बोलेनात!


BY SANJAY SONAWANI

मंगळवार, २१ जून, २०११

निर्माणकर्ता म्हणजे काय?

"जेही समाजघटक पुरातन काळापासुन मानवोपयोगी कार्ये अन्न-पशुसंवर्धन ते असंख्य जीवनोपयोगी उत्पादने/सेवा/कला/वास्तुनिर्मिती आदि माध्यमांतुन करत आले आहेत, त्यांना संशोधन-अनुभवातुन विकसीत करत आले आहेत व ज्यामुळे संस्क्रुती ख-या अर्थाने वर्धीष्णु राहीली आहे ते समाजघटक म्हणजे निर्माणकर्ता समाजघटक होत." ही आहे थोडक्यात निर्माणकर्ता या शब्दाची मला अभिप्रेत असलेली व्याख्या. आजवरचा मानवी इतिहास जो लिहिला गेला आहे तो आहे राजे-रजवाडे, धर्मनेते, न्रुशंस रानटी आक्रमकांचा. परंतू या इतिहसाला ख-या अर्थाने निर्मितिमुल्य देणारे, स्रुजनात्मक असनारे, विविध कलांची निर्मिति करत संस्क्रुतीला आधार देनारे मात्र जागतिक इतिहासाने उपेक्षित ठेवले आहेत. वर्तमानातील वास्तवही वेगळे नाही.
आज जगाची पुरातन संस्क्रुती आपल्याला कळते ती नगर रचना, वास्तु, लेणी, प्रासाद, गढ्या, किल्ले, बंदरे, नाणी, शिलालेख, मुर्त्या, मंदिरावशेष यातुन. ज्यांच्या काळात ती निर्मिती झाली याची आपल्याला माहिती असते पण त्या वास्तु/वस्तुंमागील संकल्पनांची प्रतिभा नेमकी कोणाची होती याबाबत इतिहास मौन पाळुन आहे. अर्थात ती प्रतिभा त्या-त्या व्यवसायात तरबेज असना-या समाजघटकांची होती हे अमान्य करता येत नाही. या समाज घटकांनी त्या त्या कलेत काळानुसार प्रगती/बदल केलेलेही आपल्याला आढळतात. त्यातुन आपल्याला त्यांची विकसनशील व्रुत्तीही लक्षात येते. सिंधु, टायग्रीस, युफ्राटीस आदि संस्क्रुत्यांचे जे विलक्षण अवशेष आपल्याला आज मिळतात त्यांच्या निर्माणकर्त्या समाजांबद्दल आपण अनभिद्न्य असलो तरी ते पुर्णतया खरे नाही. समुद्रमार्गे व्यापारासाठी, मत्स्योद्योगा साठी छोट्या नौका ते १००-१५० शीडांच्या नौका बनवणारे कोण होते? त्यांच्यामुळे संस्क्रुत्या जगभर पसरत गेल्या त्यांचे मुख्य योगदान आपण आज का विसरतो? कोळी लोकांनी त्यांच्या गरजेपोटी नौका शोधत नंतर सुतारांकडुन त्यांची बांढणी करुन घेत पुढे त्यात विकास होत राहिला हेच तर सत्य आहे ना?
महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार धनगर होते. पशुपालन करणारे, कधी स्थिर तर कधी भटके असा हा जनसमुह. त्यांच्यातुनच काही व्यवसाय करणारे घटक विकसीत झाले. राज्यसंस्था या नंतर अस्तित्वात आल्या. शस्त्रे बनवणारे, शेतीला सहाय्यभुत अशी साधने, शस्त्रे निर्मान करायला त्यातीलच कल्पक घटक बाहेर पडला...त्यांत सुतार, लोहार, चांभार असे अनेक घटक आले. वस्त्रांची निर्मिती अशाच कोणा अनाम आद्य विणकराने केली. जवळपास २-३ -या शतकापर्यंत भारतीय न शिवलेली प्रावरणेच वापरत असत. पुढे शिंपी समाज याच अवाढव्य समुदायातुन पुढे आला आणि शिवनकला विकसीत केली. अलंकारांचे आकर्ष्ण फक्त स्त्रीयानाच नव्हे तर पुरुषांनाही असे. असे अलंकार बनवणारे कलावंत पुढे आले. लोथल येथे तर अशा अलंकार निर्मात्यांचे कारखानेही सापडलेले आहेत. त्यांची निर्यातही होत असे. पाथरवट, मुर्तीकार, नगररचनाकार, गवंडी, आदि समाजघटकांनी या अवाढव्य वास्तु, बंदरे, नगरे यांची संकल्पना व निर्मिती केली. सेवा पुरवणारे, संरक्षण पुरवणारे, नंतर दलित म्हणुन रसातळाला पोहोचवले गेलेले महार/मातंग/वडारी/पाथरवट आदि घटकांचे योगदान तर इतिहास पार विसरला आहे. राजसत्तांनी/धर्मसत्तांनी त्यासाठी धन पुरवले हे खरेच आहे, पण निर्मितिशीलता व रचनात्मकता या अनेकविध समाजघटकांची होती.
एकाच विराट समुदायातुन वेगवेगळ्या संकल्पना/निर्मितीसाठी व्यवसायधिष्ट विभक्त वाटना-या, परंतु मुळात सर्वच एक असणा-या समाजाला जातींत विभक्त करुन त्यांची निर्मितिक्षमता व त्यातील भरारी मध्य युगात धर्ममार्तंडांनी पार घालवुन टाकली. निर्मिती पेक्षा पारलौकिक जीवनाची कास धरनारी परलोकवादी विचारसरणी लोकमतावर बिंबवत नेली आणि त्याचा परिपाक म्हणजे नवे संशोधन थांबले. अवाढव्य वास्तु/नगरे उभारण्याची इछ्छा राज्यकर्त्यांमधुनही नष्ट झाली. १३ व्या शतकानंतर शिवकालीन किल्ल्यांची रचना सोडली तर कोनतेही नवे कार्य झाल्याचे आढळुन येत नाही. पोटाला कमी मिळु लागले कि निर्मितीक्षमताही मंदावू लागते. आहे त्या व्यवसायात कोणी पडु नये अशी भावना जन्माला येते. भेद वाढत जातो...अर्थ-भेद शेवटी जातीभेदावर येवुन थांबतो.
महार समाज हा पुर्वी ग्रामरक्षक होता. लढवैय्या होता. चोर-लुटारु यापासुन गावाचे/व्यापारी तांड्यांचे रक्षन हे कार्य ते करत असत. न्यायालत्यांतील कोनत्याही, पार जमीनीच्या सीमाच्या वादांपर्यंत त्यांचीच साक्ष ग्रुहित धरली जात असे. महारचावडीचा मान गाव चावडीपेक्षा मोठा असे. राजकीय अस्थिरता जशी संपत गेली तसतसे त्यांचे महत्व संपवण्यात आले आणि त्यांना अत्यंत हीण पातळीवरची कामे करण्यास भाग पाडण्यात आले. या अस्थिरतेच्या इतिहासाला, समाजघटकांना विस्कळीत-गलितगात्र करुण टाकण्यात प्रजेला कसलेही महत्व न देणारे स्वार्थपरायण राजकीय सत्ताधारी होते, तसेच त्यांच्याच हातात हात घालुन चालणारे, प्रसंगी वर्चस्व गाजवणारे धर्मसत्ताधारीही होते.
जगात आज खालुन वरचा इतिहास (Sub-altern History) लिहिण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात अद्याप ही शाखा बाल्यावस्थेत आहे. परंतु आपण सारे मिळुन आपल्या समाजासाठी हे कार्य करायचे आहे. 
यामागील उद्देष्य हा आहे कि या सर्वच संस्क्रुतीच्या निर्माणकर्त्य्यांना त्यांच्या एकजिनसी मुळाची जाणीव करुन देत सर्वैक्याची आत्मभानात्मक जाणीव करुन देत, वर्तमानातील सर्व समस्यांशी एकदिलाने लढत पुन्हा नवनिर्मितीचे कार्य हाती घेत पुन्हा एकदा संस्क्रुती, द्न्यानसत्ता, अर्थसत्ता यात आघाडी मिळवत, जातीनिहाय विचार न करता मुक्त मनाने नवी आव्हाने स्विकारत मुळच्या निर्मानशील भावनांना जागे करत हातात हात घालुन पुढे जाणे. यात सर्वांचे सहकार्य मिळेल याचा विश्वास आहे. जातीभेद/धर्मभेद/वर्चस्ववाद मानणा-यांना या विचारसंघात स्थान नाही.


BY:SANJAY SONAWANI

सोमवार, २० जून, २०११

निर्माणकर्ता समाज संघ

नमस्कार मित्रहो,
आज भारताच्या कानाकोप-यातून चळवळीचे वारे घोंगावताना दिसत आहेत. या सर्वानी वेगवेगळ्य़ा मुद्यांवर आपला लढा उभारला आहे. पण या देशाला सांस्कृतीक चेहरा देणार निर्माण कर्तावर्ग, ईथली संपत्ती (रिअल अस्सेट) तयार करणारा कष्टकरी वर्ग व बुद्दीमत्तेची जोड देऊन या देशाला वैभवाच्या वेगवेगळ्या पातळ्या गाठून देणारा ईथला निर्माणकर्ता वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहीला. आज राजे महाराजे यानी जे काही भव्य दिव्य वास्तू उभारल्या त्यांच्या मागे पैसा हा राजाचा होता पण बुद्धी, कष्ट व अनूभव आपल्या लोकांचा होता. या देशातील सत्ता, संपत्ती व संस्कृतीचे खरे निर्माते आपण आहोत. तर आता आपण एकत्र येऊन आपल्या वैभवशाली इतिहासाची पुनरावृत्ती करु या.